ईश्वरपूरमध्ये पाण्याच्या मीटरची धडाधड चोरी! 4-5 दिवसात मोठा प्रकार, नागरिक त्रस्त
👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली |
📅
06 August 2026 |
👁 74 Views
ईश्वरपूर शहरात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या मीटर चोरीचा भलताच प्रकार सुरू झाला आहे. यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत.शहरातील विविध भागांमधून घराबाहेर आणि नळ कनेक्शन जवळ लावलेले पाण्याचे मीटर अचानक गायब होत आहेत. नागरिकांनी वारंवार ईश्वरपूर नगर परिषदेत जाऊन अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. एका वेळी अनेक ठिकाणी अशा प्रमाणात मीटर चोरी झाल्याने नगर परिषदेचे अधिकारी देखील अचंबित झाले आहेत.यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, चोर हे मीटर पितळ धातूचे आहेत असे समजून चोरी करत आहेत. परंतु प्रत्यक्षात ही मीटर बीड धातूची असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे चोरांना यातून आर्थिक फायदा होण्याची शक्यता फारच कमी आहे.नागरिक तसेच नगर परिषद प्रशासनाने याबत तातडीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. जर चोर सापडले तर त्यांच्यावर पोलीस कारवाई निश्चित होणार आहे.नागरिकांनी रात्री गस्त वाढवणे आणि दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. मीटर नसल्याने अनेक घरांची पाणी बिले आणि पाणी पुरवठा देखील विस्कळीत होण्याची भीती आहे.