कृषी विभागातील सुधारणा व शेतकरी सक्षमीकरणावर भर : पालकमंत्री विखे पाटील यांचे निर्देश

👤 संकेत सानप मुंबई | 📅 16 May 2026 | 👁 185 Views
कृषी विभागातील सुधारणा व शेतकरी सक्षमीकरणावर भर : पालकमंत्री विखे पाटील यांचे निर्देश
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्हास्तरीय आढावा बैठक पालकमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस उपस्थित राहून कृषी विभागाच्या नियोजनाचा तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी खरीप हंगामासाठी आवश्यक नियोजन, पीक विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी, कृषी विभागातील त्रुटींमध्ये सुधारणा तसेच शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी कृषी संशोधन क्षेत्रात व्यापक काम करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आगामी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासन व प्रशासन समन्वयाने कार्य करत आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी पंकज आशिया, आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार श्री. विक्रम पाचपुते तसेच कृषी व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |