बियाणे आणि औषधांच्या दरवाढीने शेतकरी मेटाकुटीला

👤 संपादक - आण्णासाहेब मेटकरी | 📅 02 May 2026 | 👁 61 Views
बियाणे आणि औषधांच्या दरवाढीने शेतकरी मेटाकुटीला
जव्हार /जितेंद्र मोरघा जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय मानला जातो. मुसळधार पाऊस पडणाऱ्या या भागात पाणी अडविण्याचे कोणत्याही प्रकारे नियोजन असल्याने केवळ या भागात खरीप हंगामात शेतीची कामे केली जातात. खरीप हंगाम संपल्यानंतर येथील शेतकरी हा पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे कुटुंबासहित स्थलांतरित होत असतो. अशी साधारण आर्थिक परिस्थिती अवलंबून असलेल्या या भागात यंदा शेतीसाठी उपयुक्त बियाणे आणि औषधांच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने येथील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्या खरीप हंगामाची चाहूल लागलेली असतानाच बळीराजासमोर नवे संकट उभे ठाकले आहे. रासायनिक खते, कीटकनाशके आणि कृषी निविष्ठांच्या किमतीत गेल्या काही दिवसात कंपन्यांनी भरघोस वाढ केल्याने शेतीचा उत्पादन खर्च गगनाला भिडणार आहे. अगोदरच बेमोसमी पाऊस, आसमानी संकटाने त्रासलेल्या शेतकऱ्याला युद्धजन्य परिस्थितीत शेतीपयोगी लागणारे वस्तू खरेदी करताना चांगलीच कसरत होणार आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मणेराजुरी येथे तलावात बुडून माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू; चिमुरडीला वाचवताना आईनेही गमावला जीव | लातूरमध्ये 'ती' बैलाच्या जागी स्वतः जुंपली नांगराला! काळजाचा थरकाप उडवणारी विदारक वास्तवता | संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! |