पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप
👤 जितेंद्र मोरघा पालघर |
📅
25 July 2026 |
👁 890 Views
पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज, दि. २५ जुलै २०२६ रोजी सूर्या नदीकाठावरील बोरशेती व किराट परिसरातील पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. हा सेवा उपक्रम भगेरिया इंडस्ट्रीज यांच्या सहकार्याने राबविण्यात आला.
या मदत वितरण कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, स्थानिक सरपंच, उपसरपंच तसेच लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूरग्रस्त नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यांना आवश्यक जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संकटकाळात समाजाच्या मदतीला धावून जाणे हीच खरी लोकसेवा असल्याचे सांगितले. पूरामुळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असून भविष्यातही गरज भासल्यास मदतीचा हात कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
"संकटाच्या काळात राजकारण नव्हे, तर सेवा" हा भारतीय जनता पक्षाचा मूलमंत्र असल्याचे सांगत पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. जनतेची सेवा हीच सर्वोच्च बांधिलकी मानून प्रत्येक संकटात नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.