आरवडे गावाच्या नामांतराला ग्रामस्थांचा जोरदार विरोध; 'गोपाळपूर' नाव बदल रद्द करण्याची मागणी

👤 संतोष एडके तासगाव | 📅 24 August 2026 | 👁 53 Views
आरवडे गावाच्या नामांतराला ग्रामस्थांचा जोरदार विरोध; 'गोपाळपूर' नाव बदल रद्द करण्याची मागणी

​आरवडे (ता. तासगाव):
ग्रामपंचायत आरवडे यांनी २१ ऑगस्ट २०२६ रोजी घेतलेल्या ग्रामसभेत गावाचे ऐतिहासिक नाव "आरवडे" बदलून "गोपाळपूर" करण्याचा ठराव मंजूर केला आहे. मात्र, हा निर्णय अत्यंत घाईगडबडीत, बहुसंख्य ग्रामस्थांना विश्वासात न घेता व लोकशाही प्रक्रियेचा अवलंब न करता घेतला असल्याचा आरोप करत 'आरवडे गाव नामांतर विरोधी संघर्ष कृती समिती' व ग्रामस्थांनी या निर्णयाविरोधात एल्गार पुकारला आहे. यासंदर्भात शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन नामांतराचा ठराव त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
​हे निवेदन गटविकास अधिकारी (पंचायत समिती तासगाव), तहसीलदार (तासगाव), प्रांत अधिकारी (मिरज), मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद सांगली) आणि जिल्हाधिकारी (सांगली) यांना सादर करण्यात आले आहे.
​ग्रामस्थांनी निवेदनात मांडलेले प्रमुख मुद्दे:
​ऐतिहासिक वारसा व ओळख: 'आरवडे' हे नाव सहस्रवर्षांचा इतिहास असलेले व जगात एकमेव नाव आहे. तासगाव पूर्व भागातील आरवडे, बलगवडे, लोढे, सावर्डे, मांजर्डे, बस्तवडे या सहा गावांच्या मालिकेत आरवडे या नाव व संस्कृतीचे विशेष स्थान आहे.
​ग्रामदैवताचे प्राचीन मंदिर: गावाच्या मध्यभागी हजार वर्षांहून अधिक प्राचीन श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिर असून या धार्मिक व सांस्कृतिक वारशाची ओळख गावाच्या मूळ नावाशी जोडलेली आहे.
​ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष: गावात अकरावी व पुढील शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरेशा बसेस नाहीत, तसेच शेतीसाठी पाणी, रस्ते व वीज या मूलभूत सुविधांचा तुटवडा आहे. अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा न करता नामांतराच्या विषयाकडे लक्ष भरकटवले गेले.
​प्रशासकीय व आर्थिक भुर्दंड: नाव बदलल्यास ७/१२ उतारे, आधार कार्ड, मतदार यादी, मालमत्ता दस्तऐवज, शाळा-कॉलेजचे दाखले व बँकिंग कागदपत्रांमध्ये बदल करावे लागतील, ज्यामुळे ग्रामस्थांना नाहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागेल.
​पर्यायी तोडगा: इस्कॉन मंदिर परिसरापुरता 'गोपाळपूर' असा स्थानिक नामउल्लेख करण्यास ग्रामस्थांचा आक्षेप नाही, मात्र त्यासाठी संपूर्ण गावाचे मूळ नाव बदलणे अयोग्य आहे.
​उपोषणाचा इशारा:
ग्रामपंचायतीने २१.०८.२०२६ रोजी घेतलेला नामांतराचा ठराव त्वरित रद्द करून, गावाला आवश्यक असणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांवर चर्चा करण्यासाठी सर्वसमावेशक ग्रामसभा बोलावावी, अशी मागणी समितीने केली आहे. प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई न केल्यास सर्व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आरवडे गावाच्या नामांतराला ग्रामस्थांचा जोरदार विरोध; 'गोपाळपूर' नाव बदल रद्द करण्याची मागणी | सांगलीत पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर किल्ला भिंतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण | कुंभवडे येथे श्री . राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल व ए . एस . पी . एम मेडीकल कॉलेज सांगुळवाडी यांचे आरोग्य शिबिर संपन्न . . . | इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद | श्रावणी दुसऱ्या सोमवारी कुणकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला | केसरेकर दाम्पत्याच्या मुलांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले शैक्षणिक पालकत्व मुलांची भेट घेऊन केले सांत्वन; शिक्षण व वसतिगृहाचा खर्च करण्याची घेतली जबाबदारी | एकजुटीने नशामुक्तीचा निर्धार करूया; अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा करूया : पालकमंत्री चंद्रकांत पाटील नशामुक्ती निर्धार पदयात्रेला सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘नशामुक्त सांगली, सुरक्षित सांगली’चा सामूहिक संकल्प | आचरा तिठ्यावर २५ ऑगस्टला नारळ लढविण्याची रंगत; महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धेचे आयोजन | उद्या सांगलीमध्ये नशामुक्त अभियान, जिल्हाधिकारी मैनाक घोष | तासगाव अंनिस शाखेतर्फे वैज्ञानिक दृष्टिकोन दिन साजरा; दाभोलकर हत्येतील सूत्रधारांना शिक्षा करण्याची मागणी |