ईश्वरपूर शहरातील हॉटेल चालकांकडून अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर

👤 राहुल टिबे सांगली | 📅 16 June 2026 | 👁 287 Views
ईश्वरपूर शहरातील हॉटेल चालकांकडून अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर
ईश्वरपूर शहरातील हॉटेल चालकांकडून अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर
आजकाल लोकांमध्ये गरजेनुसार किंवा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हॉटेलमध्ये नाश्ता आणि जेवण करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. लोक हॉटेल्स मध्ये जातात आणि मोठ्या चवीने येथील अन्नपदार्थ वर ताव मारतात. तिथे गेल्यानंतर आपल्याला आपल्या टेबलवरच मेनू कार्ड आणून दिलं जातं त्यामध्ये आपण आपल्या आवडीचे पदार्थ ऑर्डर करतो. त्यानुसार तो माणूस किचन मध्ये जाऊन ती ऑर्डर देतो. त्यानंतर थोड्यावेळाने वेटर आपल्या टेबलवर ते सर्व आणून देतो. तो वेटर वाढतो किंवा आपण स्वतः हाताने वाढून घेतो. परंतु जवळपास सर्व हॉटेल्स मध्ये नागरिकांना किचनमध्ये जाण्यास मनाई असते. त्यामुळे तिथे बाजारातून आणलेले पदार्थ कसे ठेवले जातात कसे हाताळले जातात कशा प्रकारे शिजवले जातात याबाबत लोकांना काहीचं कळत नाही. त्यामुळे लोकांना बरेचदा पोट बिघडणं, उलटी होण अशा तब्येतीच्या तक्रारी जाणवतात. त्यामुळे आपल्याला स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळणं हा आपला अधिकार आहे आणि त्यासाठी अन्नजन्य आजार टाळायचे असतील तर हॉटेल चालकांनी हे 4 नियम पाळावेच लागतील आणि त्यासाठी आपणही जागृत असलं पाहिजे

*पहिला नियम - स्वच्छता:* अन्नाला हात लावण्याआधी आणि नंतर कमीत कमी 20 सेकंद कोमट पाणी आणि साबणाने हात धुवा. कटिंग बोर्ड, किचनचा ओटा, भांडी रोज गरम पाणी आणि साबणाने स्वच्छ करा. फळं-भाज्या वाहत्या पाण्याखाली धुवा. पण लक्षात ठेवा - कच्चं मांस-मासे कधीच धुवू नका, त्याचे जंतू इकडे-तिकडे उडतात.

*दुसरा नियम - वेगळे ठेवा:* कच्चं मांस, चिकन, मासे आणि शिजवलेलं अन्न, फळं-भाज्या वेगळ्या ठेवा. कच्च्या आणि शिजवलेल्या पदार्थांसाठी वेगवेगळे चॉपिंग बोर्ड आणि चाकू वापरा. ज्या ताटात कच्चं मांस ठेवलं होतं, त्याच ताटात शिजवलेलं अन्न कधीच वाढू नका.

*तिसरा नियम - नीट शिजवा:* जंतू मारण्यासाठी अन्न योग्य तापमानापर्यंत शिजणं गरजेचं आहे. कीमा 160°F म्हणजे 71°C, तर चिकन 165°F म्हणजे 74°C पर्यंत आतून शिजलं पाहिजे. शंका असेल तर फूड थर्मामीटर वापरा.

*चौथा नियम - नीट थंड करा:* शिजवलेलं किंवा कापलेलं नाशवंत अन्न 2 तासांच्या आत फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजचं तापमान 40°F म्हणजे 4°C पेक्षा कमी आणि फ्रीझर 0°F म्हणजे -18°C ठेवा."
हे चार नियम सर्व हॉटेल चालक आणि मालकांनी पाळले तर ईश्वरपूर शहरवासीयांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळू शकेल.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आटपाडीत १० लाखांत प्रकरण दाबल्याची चर्चा; मोठ्या जनावरांच्या मटणप्रकरणामुळे खळबळ | दुःखाच्या काळात तिगाव गावाची माणुसकी; सानप कुटुंबाला ₹1 लाख 83 हजारांची मदतीचा हात | आटपाडीतील हॉटेल व्यवसायात स्वच्छतेच्या नियमांची पायमल्ली; अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष? | पुण्यात जमीन व्यवसायिकांचे ऐतिहासिक एकत्रीकरण; 150 हून अधिक व्यावसायिकांच्या उपस्थितीत PLRA ची स्थापना | ईश्वरपूर शहरातील हॉटेल चालकांकडून अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर | ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत : बसवराज पाटील | तासगावात 'कॅफे संस्कृती'चा विळखा; अल्पवयीन मुला-मुलींच्या वाढत्या राबत्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण. | आटपाडीतील नामांकित हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाची धाड? मग सत्य लपवले कोणासाठी? | २५ हजार कामगारांसह ‘घरकुल दिंडी’ मंत्रालयावर धडकणार – कॉम्रेड आडम मास्तर | वासुंबे जिल्हा परिषद शाळेत ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात साजरा |