ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत : बसवराज पाटील

👤 सतीशकुमार पडोळकर | 📅 16 June 2026 | 👁 213 Views
ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत : बसवराज पाटील
राज्यभर स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असताना ग्राहकांच्या संमतीशिवाय कोणत्याही घरावर किंवा आस्थापनावर स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नयेत, अशी ठाम भूमिका जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी मांडली आहे. तसेच जनतेमध्ये स्मार्ट मीटरबाबत जनजागृती करण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने जत तालुकाभर जागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बसवराज पाटील म्हणाले की, स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता असल्याची भावना अनेक नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे शासन व वीज वितरण कंपनीने नागरिकांच्या शंका दूर करून पूर्ण माहिती द्यावी. ग्राहकांची स्पष्ट संमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची घाई करू नये.
राज्यभर स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असताना ग्राहकांच्या संमतीशिवाय कोणत्याही घरावर किंवा आस्थापनावर स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नयेत, अशी ठाम भूमिका जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी मांडली आहे.
याबाबत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमार्फत गावोगावी बैठका, पत्रकांचे वाटप आणि नागरिकांशी संवाद साधून जागृती केली जाणार आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारी व सूचना संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
"जनतेच्या हिताला बाधा येणार असेल तर जनसुराज्य शक्ती पक्ष रस्त्यावर उतरून लोकांच्या हक्कासाठी लढा देईल," असा इशाराही बसवराज पाटील यांनी दिला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आटपाडीत १० लाखांत प्रकरण दाबल्याची चर्चा; मोठ्या जनावरांच्या मटणप्रकरणामुळे खळबळ | दुःखाच्या काळात तिगाव गावाची माणुसकी; सानप कुटुंबाला ₹1 लाख 83 हजारांची मदतीचा हात | आटपाडीतील हॉटेल व्यवसायात स्वच्छतेच्या नियमांची पायमल्ली; अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष? | पुण्यात जमीन व्यवसायिकांचे ऐतिहासिक एकत्रीकरण; 150 हून अधिक व्यावसायिकांच्या उपस्थितीत PLRA ची स्थापना | ईश्वरपूर शहरातील हॉटेल चालकांकडून अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर | ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत : बसवराज पाटील | तासगावात 'कॅफे संस्कृती'चा विळखा; अल्पवयीन मुला-मुलींच्या वाढत्या राबत्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण. | आटपाडीतील नामांकित हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाची धाड? मग सत्य लपवले कोणासाठी? | २५ हजार कामगारांसह ‘घरकुल दिंडी’ मंत्रालयावर धडकणार – कॉम्रेड आडम मास्तर | वासुंबे जिल्हा परिषद शाळेत ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात साजरा |