जनगणना २०२७ : महाराष्ट्रात स्व-गणना प्रक्रियेला प्रारंभ; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

👤 संकेत सानप मुंबई | 📅 12 May 2026 | 👁 123 Views
जनगणना २०२७ : महाराष्ट्रात स्व-गणना प्रक्रियेला प्रारंभ; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
जनगणना २०२७ अंतर्गत स्व-गणना प्रक्रियेला महाराष्ट्रात सुरुवात झाली असून महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आणि गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी संगणकाद्वारे एसई (Self Enumeration) पोर्टलवर आपली माहिती नोंदवून या उपक्रमाचा शुभारंभ केला.
यावेळी भारत सरकारच्या सहसचिव तथा राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे आणि जनगणना कार्य संचालनालयाचे सहसंचालक संतोष पायस उपस्थित होते.
याप्रसंगी मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून मोठ्या संख्येने ‘स्व-गणना’ सुविधेचा पर्याय निवडावा, असे आवाहन केले. महाराष्ट्र राज्यासाठी स्व-गणना (एसई) पोर्टल १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत कार्यरत राहणार आहे.
डॉ. निरुपमा डांगे यांनीही राज्यातील अधिकाधिक नागरिकांनी आपल्या कुटुंबाची माहिती जनगणना २०२७ च्या घरयादी व घरगणना प्रक्रियेत एसई पोर्टलवर नोंदवून या देशव्यापी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
जनगणना प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून नागरिकांना सुलभ आणि पारदर्शक सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा |