मुंबई :-आधार कार्ड काढताना किंवा त्यात दुरुस्ती करताना 2016 पूर्वीच्या जन्म दाखल्यांबाबत येणाऱ्या अडचणींवर आता तोडगा निघाला आहे. UIDAI मुंबई ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या मान्यतेनुसार दि. 28/07/2026रोजी UIDAI ने पत्र जारी केले आहे. त्यानुसार 2016 पूर्वीचे ऑफलाईन पद्धतीने दिलेले आणि जुन्या फॉर्मेटमधील जन्म दाखले आता आधारकार्डच्या माहितीसाठी ग्राह्य धरले जातील
2016 पूर्वी महाराष्ट्रात जन्म-मृत्यूची नोंदणी ऑफलाईन पद्धतीने होत होती. काही महानगरपालिका, नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींनी स्वतःच्या software मधून ऑनलाईन दाखले दिले होते.2016 नंतरकेंद्र शासनाच्या CRS पोर्टल द्वारे जन्म-मृत्यू नोंदणी सुरू झाली.2016 पूर्वीचे सर्व दाखल्यांचे संगणकीकरण अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना आधारसाठी जुने दाखले ग्राह्य धरले जात नसल्याने अडचण येत होती.आता डिजिटायझेशन न झालेल्या 2016 पूर्वीच्या ऑफलाईन जन्म दाखल्यांना देखील आधार नोंदणीसाठी मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः वृद्ध नागरिक आणि ग्रामीण भागातील लोकांना आता आधार अपडेट/नोंदणीसाठी नवीन दाखला काढण्याची गरज भासणार नाही.