सामाईक विहिरीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू

👤 आकाश दडस सातारा | 📅 03 August 2026 | 👁 70 Views
सामाईक विहिरीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू
माण तालुक्यातील पळसवाडे येथील श्री. नानासो रामहरी यादव यांनी सामाईक विहिरीवरील अतिक्रमण तात्काळ हटविण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

उपोषणकर्त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, संबंधित सामाईक विहीर काटक्या, झुडपे व माती टाकून बुजविण्यात आली असून ती तात्काळ मोकळी करून मिळावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच विहिरीवरील ५ एचपी मोटार, सुमारे १०० फूट काळा गोटा पाईप आणि स्टार्टर चोरीला गेल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी गुन्हा नोंदवून पंचनामा करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय जेसीबीच्या सहाय्याने विहीर बुजविण्यात आल्याचा आरोप करत, संबंधित माहिती देणारे व्यक्ती, जेसीबी चालक व मालक यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

जोपर्यंत मागण्यांवर प्रशासनाकडून ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा उपोषणकर्ते श्री. नानासो रामहरी यादव यांनी दिला आहे. प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
सामाईक विहिरीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू | सावळजमध्ये साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप | ग्रामीण मातीतला ओम आज ‘टीम इंडिया’चा स्टार; व्हॉलीबॉलच्या स्वप्नाला मिळाली आंतरराष्ट्रीय भरारी | झरे येथे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न | तासगाव तालुक्यात समन्यायी पाणी वाटपाची गरज; "शेतकऱ्यांना न्याय्य पाणी कधी मिळणार?" – डॉ. भारत पाटणकर | 9 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आष्टा नगरीत | ऊसतोड कामगाराचा मुलगा ते शिवछत्रपती पुरस्कार विजेता; शंकर गदईंचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर | आचरा गावातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करा; अन्यथा १५ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा | मालवण बंदरा येथील पोर्टा केबिनचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन | प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात पालकमंत्री नितेश राणे |