लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य मानवतेचा आणि सामाजिक परिवर्तनाचा दीपस्तंभ –श्री. दिनराज वाघमारे

👤 सतीशकुमार पडोळकर | 📅 01 August 2026 | 👁 644 Views
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य मानवतेचा आणि सामाजिक परिवर्तनाचा दीपस्तंभ –श्री. दिनराज वाघमारे


जत, दि. १(प्रतिनिधी ): राजे रामराव महाविद्यालय, जत येथील सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लेखन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. के. के. रानगर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यप्रेमी श्री. दिनराज वाघमारे उपस्थित होते.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रा. के. के. रानगर यांनी सांगितले, "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित नसून ते सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारे आहे. विद्यार्थ्यांनी लेखन, वाचन आणि चिंतनाची सवय जोपासून समाजाभिमुख दृष्टी विकसित केली तरच शिक्षणाचे खरे सार्थक होईल."
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे श्री. दिनराज वाघमारे म्हणाले, "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे कष्टकरी, शोषित आणि पीडित समाजाच्या वेदना, संघर्ष व स्वाभिमानाचे जिवंत प्रतिनिधित्व करणारे आहे. त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू माणूस आणि मानवताच राहिलेला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेत सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रनिर्मितीत सक्षम व सुसंस्कृत नागरिक म्हणून योगदान द्यावे."

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रा. के. के. रानगर यांनी सांगितले, "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित नसून ते सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारे आहे. विद्यार्थ्यांनी लेखन, वाचन आणि चिंतनाची सवय जोपासून समाजाभिमुख दृष्टी विकसित केली तरच शिक्षणाचे खरे सार्थक होईल."

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी केले. त्यांनी लेखन प्रेरणा दिनाचे महत्त्व स्पष्ट करून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक व परिवर्तनवादी कार्याचा आढावा घेतला.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. रोहिणी शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |