गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप

👤 आकाश दडस सातारा | 📅 27 July 2026 | 👁 206 Views
गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप
गुरुपौर्णिमेपूर्वी स्वच्छतेची मागणी; अन्यथा १५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा
गुरुपौर्णिमेनिमित्त श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून हजारो भाविक गोंदवले येथे येणार असताना, गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र व हायस्कूल परिसरात रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे लेखी तसेच तोंडी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावातील दवाखाना, शाळा व सार्वजनिक रस्त्यांच्या परिसरात प्लास्टिक, घरगुती कचरा आणि इतर घनकचरा उघड्यावर साचलेला असून, दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, "कृपया येथे कचरा टाकू नये" असे फलक लावलेले असतानाही त्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गुरुपौर्णिमेच्या काळात हजारो भाविक श्रींच्या दर्शनासाठी गोंदवले येथे येतात. मात्र त्यांचे स्वागत स्वच्छ वातावरणाऐवजी कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी होत असल्याने गावाच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याबाबत ग्रामस्थ राहुल पाटील यांनी सांगितले की, "संबंधित प्रशासनाला अनेकदा निवेदने देऊन तसेच प्रत्यक्ष भेटून स्वच्छतेची मागणी केली. मात्र अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही. कचऱ्यामुळे भाविक, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि रुग्ण यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

हायस्कूलच्या स्वच्छतागृह परिसरातही उघड्यावर प्लास्टिक कचरा पडलेला आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दवाखान्यालगत कचरा साचल्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनाही दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. तसेच शाळेच्या परिसरातील कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


गुरुपौर्णिमेपूर्वी तातडीने संपूर्ण परिसराची स्वच्छता करून नियमित कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थ राहुल पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे आता संबंधित प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते, याकडे ग्रामस्थांसह भाविकांचेही लक्ष लागले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |