भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्याच्या दृष्टीने सौ. शुभांगी सागर नाकाडे (पळशी) यांची भाजप महिला मोर्चा, माण म्हसवड मंडल तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र भाजप महिला मोर्चाच्या सातारा जिल्हाध्यक्षा सौ. तेजस्विनी संग्राम घोरपडे यांनी प्रदान केले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ आणि सोनिया वहिनींनी दिलेली ही जबाबदारी त्या निष्ठेने पार पाडतील.
सौ. शुभांगी नाकाडे या गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असून महिलांचे प्रश्न, जनजागृती, तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सौ. शुभांगी नाकाडे यांनी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि महिलांना संघटित करून जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करणार असल्याची भावना व्यक्त केली.
खर तर शुभांगी नाकाडे यांना खूप मोठा राजकीय वारसा देखील आहे. त्यांचे आजोबा स्वर्गीय बाबुराव शंकरराव पाटील हे जाशी गावचे 25 वर्ष बिनविरोध सरपंच होते.सेच त्यांचे आईकडील आजोबा स्वर्गीय नामदेवराव निवृत्ती नाईक हे देखील लाखेवाडी इंदापूर या गावचे 25 वर्ष बिनविरोध सरपंच होते.त्यामुळे राजकीय गोष्टींचं बाळकडू त्यांना लहानपणात मिळालेला आहे.तसेच त्यांच्या या यशाच्या वाट्यात त्यांच्या पळशी गावातील श्री गणेश मंडळ दत्तनगर व त्यांच्या सर्व मैत्रिणी त्यांच्याशिवाय हे यश नेहमी अपूर्ण असेल या त्यांच्या भावना आहेत.