आयुर्वेदतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सात्त्विक, हलका आहारच योग्य

👤 आशुतोष फसाले | 📅 19 July 2026 | 👁 116 Views
आयुर्वेदतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सात्त्विक, हलका आहारच योग्य
आषाढात उपवासाला साबुदाणा-बटाटा टाळा

आषाढ महिन्याची सुरुवात होताच अनेक घरांमध्ये चातुर्मास, एकादशी, सोमवार, गुरुवार अशा विविध धार्मिक व्रत-वैकल्यांना प्रारंभ होतो. श्रद्धा म्हणून उपवास केला जात असला, तरी तो प्रत्येकासाठी सारखाच लाभदायी ठरेल, असे नाही. वय, प्रकृती, दैनंदिन शारीरिक श्रम, आधीपासून असलेले आजार आणि हवामान यांचा विचार न करता दिवसभर उपाशी राहणे शरीरासाठी अपायकारक ठरू शकते. या काळात साबुदाणा, बटाटा, तळलेले आणि गोड पदार्थ टाळून हलका, सहज पचणारा आणि संतुलित आहार घेण्याचा सल्ला आयुर्वेद तज्ज्ञांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिला.

सात्त्विक, हलका आहार घ्या
* राजगिरा, शेंगदाणे, खोबरे, गूळ, रताळे आणि दूध यांचा आहार लाभदायक.
* सफरचंद, केळी यांसारखी हंगामी फळे आणि फलाहार घ्या.
* शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी नारळ पाणी आणि ताक प्यावे.
* उपवास सोडताना (पारण करताना) मूग डाळीच्या खिचडीसारखा सहज पचणारा आहार.

उपवास सोडताना हलका आहार घ्या
"उपवास हे केवळ धार्मिक आचरण नसून ते एक शास्त्रीय आरोग्यशास्त्र आहे. फलाहार, नारळ पाणी किंवा ताक या सात्त्विक पदार्थांचे सेवन पथ्यकारक ठरते. उपवास सोडताना जड आहार न घेता मूग डाळीच्या खिचडीसारखा हलका आहार घेणे योग्य ठरेल."
अर्जुन दबडे, आयुर्वेदाचार्य

पचनास जड आहार टाळा
उपवासाला केवळ साबुदाणा, बटाटा यांवर अवलंबून राहू नका.
भजी, वडे असे अति तळलेले आणि अतिस्निग्ध पदार्थ टाळा.
बाहेरचे किंवा अतिगोड, जड पदार्थ टाळा.
मसालेदार पदार्थ खाल्ले, तर पोटात जळजळ, ॲसिडिटी होईल.

केवळ श्रद्धा नको, प्रकृतीचाही विचार करा
"आषाढ काळात पचनशक्ती कमी होते. उपवास करताना श्रद्धेसोबत स्वतःची प्रकृती, वय आणि आजार यांचा विचार करा. दिवसभर उपाशी राहण्यापेक्षा हलका आहार घ्यावा, थोडे-थोडे कोमट पाणी प्या. राजगिरा, शेंगदाणे, खोबरे, गूळ, रताळे, दूध आणि फळे शरीराला ऊर्जा देतात. तेलकट पदार्थ टाळा."

अमित मिसाळ, आयुर्वेदाचार्य
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |