मोटेवाडी दुर्घटनेतील बाधित कुटुंबीयांना आर्थिक दिलासा; प्रत्येकी ५० हजारांचे धनादेश सुपूर्द

👤 सतीशकुमार पडोळकर | 📅 01 July 2026 | 👁 246 Views
मोटेवाडी दुर्घटनेतील बाधित कुटुंबीयांना आर्थिक दिलासा; प्रत्येकी ५० हजारांचे धनादेश सुपूर्द
मोटेवाडी, ता. जत (प्रतिनिधी): मोटेवाडी (ता. जत) येथील मरगुबाई मंदिर परिसरात काही दिवसांपूर्वी भिंत कोसळून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या पाठपुराव्यानंतर आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी भारती विद्यापीठाच्या वतीने प्रत्येक मृताच्या वारसांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. या मदतीचे धनादेश आज मोटेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात संबंधित वारसांना मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. आर्थिक मदतीमुळे संकटग्रस्त कुटुंबांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, "मोटेवाडीतील ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी असून सहा कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा कठीण प्रसंगी बाधित कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. आमदार डॉ. विश्वजित कदम आणि कदम कुटुंबीय समाजातील संकटग्रस्त नागरिकांना सातत्याने मदतीचा हात देत आले आहेत. महाराष्ट्रात कुठेही नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य दुर्घटना घडल्यास सामाजिक बांधिलकी जपत मदत करण्याची त्यांची परंपरा आहे. भारती विद्यापीठ हॉस्पिटलच्या माध्यमातूनही गरजू रुग्णांना सातत्याने वैद्यकीय मदत दिली जाते. भविष्यातही या बाधित कुटुंबीयांना आवश्यक ती मदत आणि न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू."
यावेळी बोलताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, "मोटेवाडीतील ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी असून सहा कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा कठीण प्रसंगी बाधित कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. आमदार डॉ. विश्वजित कदम आणि कदम कुटुंबीय समाजातील संकटग्रस्त नागरिकांना सातत्याने मदतीचा हात देत आले आहेत. महाराष्ट्रात कुठेही नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य दुर्घटना घडल्यास सामाजिक बांधिलकी जपत मदत करण्याची त्यांची परंपरा आहे. भारती विद्यापीठ हॉस्पिटलच्या माध्यमातूनही गरजू रुग्णांना सातत्याने वैद्यकीय मदत दिली जाते. भविष्यातही या बाधित कुटुंबीयांना आवश्यक ती मदत आणि न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू."
तसेच त्यांनी या मदतीसाठी आमदार डॉ. विश्वजित कदम, भारती विद्यापीठ आणि कदम कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमास जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महादेव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य पिराप्पा माळी, बिराप्पा शिंदे, भिमगोंडा पाटील, मोटेवाडीचे तलाठी, पोलीस पाटील, सरपंच, नागेश मोटे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुर्घटनेनंतर तातडीने मदतीसाठी पुढाकार घेऊन बाधित कुटुंबीयांना आर्थिक दिलासा दिल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी आमदार डॉ. विश्वजित कदम, माजी आमदार विक्रमसिंह सावंत आणि भारती विद्यापीठाचे आभार मानले. संकटाच्या काळात समाजाने एकजुटीने उभे राहून अशा कुटुंबांना आधार देणे हीच खरी मानवता असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |