जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कळसुली गावात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सरपंच सचिन पारधीये यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी कृषी अधिकारी श्रीमती प्रभु, कृषी सहाय्यक साधना जाधव, कळसुलीच्या पोलिस पाटील सारिका कदम यांच्यासह अन्विता कदम, आराध्या घाडीगावकर, मोहिनी घाडीगावकर, नीता गुरव, सुकन्या कदम, प्रज्ञा कदम, कविता कदम, भाग्यश्री राणे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
उपस्थितांनी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.