आदर्श सांसद ग्राम एनकुळच्या सुपुत्राचा राज्यस्तरीय गौरव

👤 संकेत तुकाराम सानप मुंबई. | 📅 08 June 2026 | 👁 123 Views
आदर्श सांसद ग्राम एनकुळच्या सुपुत्राचा राज्यस्तरीय गौरव
अरुण भगवान खरमाटे यांना आधार फाउंडेशनचा "राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२६" जाहीर
राहुरी येथील आधार फाउंडेशनतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा "राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२६" आदर्श सांसद ग्राम एनकुळ येथील सुपुत्र श्री अरुण भगवान खरमाटे यांना जाहीर करण्यात आला आहे. समाजहित, जनसेवा, सामाजिक बांधिलकी आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
श्री अरुण भगवान खरमाटे यांनी आपल्या कार्यातून समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने योगदान देत सामाजिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली असून समाजाप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि सेवाभाव याचा गौरव म्हणून आधार फाउंडेशनने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
या पुरस्काराच्या घोषणेनंतर एनकुळ ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक संस्थांकडून श्री खरमाटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून गावाच्या नावलौकिकात भर पडली आहे.
आधार फाउंडेशनच्या वतीने लवकरच आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
श्री अरुण भगवान खरमाटे यांचे "राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२६" जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मणेराजुरी येथे तलावात बुडून माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू; चिमुरडीला वाचवताना आईनेही गमावला जीव | लातूरमध्ये 'ती' बैलाच्या जागी स्वतः जुंपली नांगराला! काळजाचा थरकाप उडवणारी विदारक वास्तवता | संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! |