देशाला महासत्ता बनविण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही : पालकमंत्री नितेश राणे

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 24 May 2026 | 👁 358 Views
देशाला महासत्ता बनविण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही : पालकमंत्री नितेश राणे
भाजपा सिंधुदुर्ग आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळेस भेट देऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा
मालवण | प्रतिनिधी :
भाजपा हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष असून, हिंदुत्वाचा विचार देशभर प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य भाजपाने केले आहे. देशाला महासत्ता बनवायचे असेल, तर हिंदुत्वाचा विचार अधिक व्यापकपणे रुजविण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी चौके वाघवणे येथे बोलताना केले.

भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने मालवण तालुक्यातील चौके वाघवणे येथील नॅनी ग्रँड रिसॉर्ट येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत आयोजित प्रशिक्षण अभियान कार्यशाळेस भेट देऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, प्रमुख वक्ते अभिजित सामंत उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, आज कार्यकर्ता म्हणून आपल्या समोर उभा आहे. भाजपा कार्यकर्ता हा अभिमान आहे. कार्यकर्ते यांना न्याय देणारा पक्ष म्हणजे भाजप. कार्यकर्ते यांना दिलेला शब्द पाळला जातो तो पक्ष भाजप. एकजुटीने काम करा, आपला पक्ष मजबूत करा. कार्यकर्ते यांनी पक्षासाठी वेळ द्यावा. असे आवाहन त्यांनी केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ठेकेदारांना अभय, नागरिकांना त्रास' | पीक विम्यात देवगडच्या शेतकऱ्यांवर अन्याय; कृषी अधिकाऱ्यांना सभागृहात धारेवर | वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तब्बल आठ तासाने मिळाला मृतदेह..... | पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने करुळ येथील शेतकरी बेपत्ता | ओटभरणी समारंभात रुजवले संस्कारांचे बीज! | अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव | नगराध्यक्ष यु. टी. जाधव यांनी पारावर ज्येष्ठ नागरिकांची घेतली भेट; विकासकामांवर साधला संवाद | 'माणुसकीचा रेनकोट' : विश्वनायक फाउंडेशनकडून सिग्नलवरील गरजू बालक, महिला व वृद्धांना पावसाळी रेनकोटचे मोफत वाटप | सांगलीत 500+ पदांसाठी भव्य रोजगार मेळावा! 30 जुलैला 19 कंपन्यांची भरती | पत्रकार अक्षय यादव यांना ‘महाराष्ट्र जनगौरव पुरस्कार–२०२५’ने गौरविण्यात आले |