करूळ गावावर शोककळा.... धरणात तीन मुलींचा बुडून मृत्यू...

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 13 May 2026 | 👁 247 Views
करूळ गावावर शोककळा.... धरणात तीन मुलींचा बुडून मृत्यू...
करुळ जामदारवाडी धरणात तीन मुलीचा
बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या तीनही शाळकरी मुली असून दोघी करूळ भोयडेवाडी येथील तर एक कुसूर येथील आहे. मामाच्या गावी आली होती ही घटना बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

करुळ जामदारवाडी येथील धरणात अंघोळीसाठी गेलेल्या तन्वी अनंत माळकर (16) करुळ, स्वरा संदीप सुर्वे (11) कुसूर ऋतिका संतोष पाटील (14) करुळ यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असणाऱ्या तिघांचे प्राण वाचले आहेत

4 तरुणी आणि 2 तरुण असे एकूण 6 जण करुळ जामदार वाडी येथील धरणात अंघोळी साठी गेले असता पोहण्या मोह आवरता आला नाही त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने तिघी जणी पाण्यात बुडाली बाराच वेळ दिसून न आल्याने शोधाशोद केली असता पाण्यात बुडाल्याचे सहकाऱ्याच्या लक्षात आले त्यांनी आरडावोरड केली. गावातील काहींनी धरणाच्या दिशेने धाव घेतली ताबडतोब त्या तिघीना बाहेर काढले परंतु प्राण वाचविण्याचे प्रयत्न अपयेशी ठरले नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. एकूणच या दुर्दैवी घटनेने करूळ गावावर शोककळा पसरली आहे या बाबत पोलीस तपास करीत आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |