भारतीय जनता पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नसून ती एक विचारधारा आहे - प्रमोद जठार

👤 तुषार शिंगाडे | 📅 08 May 2026 | 👁 168 Views
भारतीय जनता पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नसून ती एक विचारधारा आहे - प्रमोद जठार
२०२९ मध्ये ‘शत-प्रतिशत’ यश मिळवायचे असेल, तर आतापासूनच जनतेच्या प्रश्नांवर काम करा”
भारतीय जनता पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नसून ती एक विचारधारा आहे. या प्रवाहामध्ये सामील होणारा प्रत्येक व्यक्ती, मग तो काल आलेला असो वा जुना, तो आपोआप निष्ठावानच होतो. त्यामुळे मनातल हेेवेदावे काढून टाका आणि प्रत्येकाचे स्वागत करा. २०२९ मध्ये ‘शत-प्रतिशत’ यश मिळवायचे असेल, तर आतापासूनच जनतेच्या प्रश्नांवर काम करा,” असे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांनी आज येथे केले. जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आमदार जठार यांचा मालवण तालुका भाजपच्यावतीने येथील पक्ष कार्यालयात भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, विलास हडकर, महेश मांजरेकर, मंदार केणी, पंकज सादये, शिल्पा खोत, अन्वेषा आचरेकर, अमिता निवेकर, दीक्षा गावकर, रविकिरण तोरसकर, सौ. लुडबे, राजू परुळेकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. जठार म्हणाले की, “मला आमदार केले ते केवळ कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे आणि वरिष्ठ नेत्यांच्या विश्वासामुळे. पक्षासाठी जे जे उत्तम करता येईल, ते आपण करूया. या पक्षात कोणाचीही मक्तेदारी नाही. आपण साडेतीन हजार वर्षांची महान परंपरा सांगणाऱ्या संस्कृतीचे पाईक आहोत. त्यामुळे दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानाने सामावून घ्या. ते पुन्हा नाराज होऊन दुसऱ्या पक्षात जातील अशी कृती आपल्याकडून होता कामा नये. सत्ता आणि संपत्ती आली की अनेकदा माणसाला गर्व होतो, पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की पक्ष हे केवळ एक साधन आहे. साध्य तर शेवटच्या गरीब माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हे आहे. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या माध्यमातून योजना तळागाळापर्यंत पोहोचवा. बेरोजगार, पाणी प्रश्न आणि मूलभूत सुविधांसाठी कार्यकर्त्यांनी ‘मंत्री’ म्हणून जबाबदारी स्वीकारली पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले “मालवण आज जगाच्या नकाशावर एक ‘वर्ल्ड डेस्टिनेशन’ म्हणून ओळखले जात आहे. येथील सी-वर्ल्ड प्रकल्प, कृषी पर्यटन आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन कल्पना घेऊन पुढे या. मालवणच्या विकासाचा एक ठोस ‘रोडमॅप’ तयार करा. पालकमंत्री आणि शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. विकासाचा जो बॅकलॉग आहे, तो आपल्याला भरून काढायचा आहे.” निवडणुका युतीमध्ये लढल्या जातात, पण पक्ष कार्यकर्त्यांच्या समन्वयावर चालतो. पालघरपासून कोकणापर्यंत समन्वयाचे काम माझ्याकडे आहे आणि तंटामुक्तीच्या भूमिकेतून आपण सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणार आहोत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी प्रभाकर सावंत, धोंडी चिंदरकर, मंदार केणी, विलास हडकर यांनी आपले विचार मांडले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |