“जनतेची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही” — वडगाव पान आर.टी.ओ. कॅम्पमध्ये प्रशासनाला कडक सूचना आमदार अमोल खताळ पाटील

👤 संकेत तुकाराम सानप ( मुंबई मंत्रालय) | 📅 20 May 2026 | 👁 298 Views
“जनतेची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही” — वडगाव पान आर.टी.ओ. कॅम्पमध्ये प्रशासनाला कडक सूचना आमदार अमोल खताळ पाटील
वडगाव पान येथे आयोजित करण्यात आलेल्या आर.टी.ओ. कॅम्पला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी करण्यात आली. यावेळी कॅम्पमध्ये उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत सर्वसामान्य नागरिकांची कोणत्याही प्रकारची अडवणूक होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच नागरिकांची सर्व कामे पारदर्शक, जलद व तत्परतेने पूर्ण करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. नागरिकांना वेळेत सेवा मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून, जनतेची गैरसोय अजिबात सहन केली जाणार नाही, असा इशाराही यावेळी आमदार अमोल खताळ पाटील यांनी अधिकारी वर्गाला दिला
आर.टी.ओ. कॅम्पमध्ये येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि कामकाजात कोणताही विलंब होऊ न देणे यावर भर देण्यात आला. यावेळी अनेक नागरिकांनी कॅम्पच्या माध्यमातून होत असलेल्या सोयीबद्दल समाधान व्यक्त केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मणेराजुरी येथे तलावात बुडून माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू; चिमुरडीला वाचवताना आईनेही गमावला जीव | लातूरमध्ये 'ती' बैलाच्या जागी स्वतः जुंपली नांगराला! काळजाचा थरकाप उडवणारी विदारक वास्तवता | संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! |