देशभक्ती, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे हीच टिळकांना खरी आदरांजली : प्रा. के. के. रानगर

👤 सतीशकुमार पडोळकर | 📅 23 July 2026 | 👁 428 Views
देशभक्ती, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे हीच टिळकांना खरी आदरांजली : प्रा. के. के. रानगर
जत : (प्रतिनिधी)-
राजे रामराव महाविद्यालय, जत  सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. के. के. रानगर हे होते, तर मा. श्री. प्रभाकरभाऊ जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे मा. श्री. प्रभाकरभाऊ जाधव म्हणाले, "लोकमान्य टिळकांनी भारतीयांच्या मनात स्वराज्याची ज्योत चेतवली. शिक्षण, राष्ट्रप्रेम, सामाजिक जागृती आणि संघटनशक्ती यांच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. आजच्या युवकांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करून जबाबदार नागरिक म्हणून राष्ट्रविकासात सक्रिय योगदान द्यावे. टिळकांचे विचार हे केवळ इतिहास नसून ते आजच्या काळातील प्रेरणादायी जीवनमूल्ये आहेत."
अध्यक्षीय भाषणात प्रा. के. के. रानगर यांनी सांगितले, "लोकमान्य टिळकांचे व्यक्तिमत्त्व हे ज्ञान, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर्श आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच देशभक्ती, स्वाभिमान, सामाजिक बांधिलकी आणि चारित्र्याची मूल्ये जोपासली तरच टिळकांच्या कार्याला खरी मानवंदना ठरेल. त्याचबरोबर आपल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक संस्थापक थोर स्वातंत्र्यसेनानी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या त्यागाचे स्मरण करणे ही आज काळाची गरज आहे."

अध्यक्षीय भाषणात प्रा. के. के. रानगर यांनी सांगितले, "लोकमान्य टिळकांचे व्यक्तिमत्त्व हे ज्ञान, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर्श आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच देशभक्ती, स्वाभिमान, सामाजिक बांधिलकी आणि चारित्र्याची मूल्ये जोपासली तरच टिळकांच्या कार्याला खरी मानवंदना ठरेल. त्याचबरोबर आपल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक संस्थापक थोर स्वातंत्र्यसेनानी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या त्यागाचे स्मरण करणे ही आज काळाची गरज आहे."

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी केले. त्यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा परिचय करून देत जयंती साजरी करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. आभार प्रा. विशाल गोडबोले यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा |