दलितांच्या लेकीबद्दल सरकार किती उदासीन आहे - दिपक केदार

👤 अतुल सोनकांबळे | 📅 09 July 2026 | 👁 154 Views
दलितांच्या लेकीबद्दल सरकार किती उदासीन आहे - दिपक केदार
माळशिरस मातंग समाजाच्या उषाताई साठे या मजूर महिलेला गोळी झाडून संपवले आहे. आरोपीने जातीचा माज केला आणि एका गरीब अनुसूचित जातीच्या महिलेला क्रूरपणे संपवले आहे. राज्याला हादरून टाकणारी ही घटना आहे.दलितांच्या लेकीबद्दल सरकार किती उदासीन आहे. मिडियात दलितांच्या लेकीची बातमी नाही. मोठा शोध घेतल्यानंतर मला त्यांच माळखांबी गाव शोधण्यात यश आलं. कुटुंब भयभीत आहे. 10 वर्ष झालं हे कुटुंब त्या नराधम सचिन देशमुखकडे मजुरीचे काम करत होते. गावगुंड, सावकारी, जात आणि पैशाचा माज या बळावर एका दलित लेकीची हत्या केली. मी सरकारला मागणी करतो, दलित महिलेला न्याय देण्यासाठी नसरापुरच्या धर्तीवर 50 दिवसात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या उद्देशाने चांगला सरकारी वकील लावून तत्काळ न्याय दिला पाहिजे.
पीडित कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी व 50 लाखांची मदत करून 5 एकर जमीन देण्यात यावी. आरोपीची संपत्ती जप्त करावी, त्याने शस्त्र कुठून आणले, त्याच्या कटात आणखी कुणी सामील आहेत का याची एसआयटी मार्फत चौकशी करावी. पँथर दिपक भाऊ केदार यानी मागनी केली आहे
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |