मिठमुंबरीत मनरेगा अंतर्गत बांधलेल्या गोठ्याचा वापर इतरत्र कामासाठी

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 June 2026 | 👁 247 Views
मिठमुंबरीत मनरेगा अंतर्गत बांधलेल्या गोठ्याचा वापर इतरत्र कामासाठी
मिठमुंबरी सरपंच यांची उपजिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मीठमुंबरी येथील विजय शांताराम तोडणकर यांना सन २०२२-२३ मध्ये गोठा बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली होती. सदर गोठा बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये गुरे ठेवणे बंधनकारक असल्याचा ठराव मिठमुंबरी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत करण्यात आला होता. त्यानुसार संबंधित लाभार्थ्याने १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर लेखी हमीपत्रही दिले होते, असे ग्रामपंचायतीच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मात्र गोठा बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप गोठ्यात गुरे ठेवण्यात आलेली नसून सध्या त्या ठिकाणी आंबा काढणीसाठी आलेल्या वेगवेगळ्या साहित्याचा साठा ठेवण्यात आल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले आहे.

याबाबत संबंधित लाभार्थ्याने शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करत मीठमुंबरी ग्रामपंचायत सरपंच यांनी उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |