तालुक्यात रविवारी दुपारी मान्सूनचे दमदार आगमन झाले. तालुक्यात सर्वत्र जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. काल देखील तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. रविवारी दुपारी जवळपास तासभर पाऊस कोसळला. या पावसामुळे उकडाने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील भुईबावाडा व सर्व घाट परिसरात जोरदार पाऊस झाला.
पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर चिखल माती आल्याने रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे घाट मार्गातून वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. मागील वर्षी मे महिन्याच्या अंदाजे 9 तारखेपासून पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे तालुक्यावरील पाणी टंचाईचे संकट टळले होते. मात्र यावर्षी मे महिन्यात संपूर्ण सहा जून उजाडला तरी ही पावसाचे आगमन झाले नाही. शेतकरी शेताची जय्यत करून हा आकाकडे नजरा लावून बसले होते.
अखेर रविवारी सकाळपासून आकाश ढगांनी व्यापले आणि दुपारी पावसाला सुरुवात झाली. विजांच्या गडगडाटासह काही भागात पावसाचा जोरदार वर्षाव झाला. तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात चांगला पाऊस झाला. या पावसामुळे शेती कामांना अधिक गती मिळणार आहे. काही शेतकऱ्यांनी खरीप हंगाम शेतीची मरू केली आहे. पुढील चार दिवस पाऊस असाच झाल्यास शेतकरी भात पेरणीस पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला सु करणार हे निश्चित आहे.