गावांतील विकास कामांची व्याप्ती वाढणार! ग्रामपंचायतींना विशेष अनुदानातून मिळणार 15 ते 20 लाख

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 21 July 2026 | 👁 61 Views
गावांतील विकास कामांची व्याप्ती वाढणार! ग्रामपंचायतींना विशेष अनुदानातून मिळणार 15 ते 20 लाख
मुंबई | महाराष्ट्र शासन :-
ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे ग्रामपंचायतींना जन सुविधांसाठी विशेष अनुदानातून 5 नवीन प्रकारची कामे करता येणार आहेत.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना खालील कामांसाठी थेट निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे:
1.गावांमध्ये दिवाबत्तीची सोय करणेसाठी - कमाल मर्यादा 15 लाख रुपये
2.शासकीय कार्यालयावर सोलर बसविणेसाठी कमाल मर्यादा 20 लाख रुपये
3 वाचनालय इमारत बांधकाम करणेसाठी कमाल मर्यादा 20 लाख रुपये
4.क्रीडांगण विकास करणेसाठी कमाल मर्यादा 20 लाख रुपये
5.गावांच्या हद्दीत असलेल्या शासकीय जागांचे सौंदर्यीकरण करणेसाठी कमाल मर्यादा 15 लाख रुपये
महत्वाचे म्हणजे शासनाने स्पष्ट केले आहे की, या योजनेंतर्गत मंजूर करण्यात येणारी कामे अन्य कोणत्याही योजनेमधून प्रस्तावित करण्यात किंवा घेण्यात येऊ नयेत. म्हणजेच दुबार निधीला बंदी असेल.


Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |