शिक्षक भरती 'जिल्हा संवर्ग' करून स्थानिकांना प्राधान्य द्या: आ. प्रमोद जठार

👤 संकेत तुकाराम सानप (मंत्रालय मिडिया प्रति व संपादक मुंबई) | 📅 26 June 2026 | 👁 151 Views
शिक्षक भरती 'जिल्हा संवर्ग' करून स्थानिकांना प्राधान्य द्या: आ. प्रमोद जठार
मुंबई- राज्यातील शिक्षकांची भरती राज्य स्तरावर न करता जिल्हा संवर्ग पद्धतीने करावी आणि स्थानिक उमेदवारांना ८० टक्के प्राधान्य द्यावे, अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत केली. ते म्हणाले, सध्या सिंधुदुर्ग- रत्नागिरीत ८० टक्के शिक्षक बाहेरील जिल्ह्यांतील असून स्थानिक तरुण रोजगारासाठी मुंबईत स्थलांतर करत असल्याचे सभागृहात निदर्शनास आणून दिले. स्थानिकांना थेट नोकरीत प्राधान्य देण्याऐवजी 'जिल्हा संवर्ग पद्धत राबवल्यास हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकेल आणि स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न सुटेल, असा कायदेशीर मार्गही त्यांनी सुचवला. या निर्णयामुळे गावातील शाळा खऱ्या अर्थाने भरभराटीला येतील आणि रोजगाराअभावी कोकणात बंद असलेली ८० टक्के घरे पुन्हा उघडतील, असा विश्वास व्यक्त करत शासनाने याबाबत तातडीने धोरणात्मक बदल करावा, अशी आग्रही भूमिका जठार यांनी मांडली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |